![](https://static.wixstatic.com/media/b5306c_671625b2a7e34c41826b69b87964b8ca~mv2.jpeg/v1/fill/w_147,h_80,al_c,q_80,usm_0.66_1.00_0.01,blur_2,enc_auto/b5306c_671625b2a7e34c41826b69b87964b8ca~mv2.jpeg)
प्रचाराच्या रणधुमाळीच्या अखेरच्या टप्प्यात दक्षिण मतदारसंघात गडमुडशिंगी, चिंचवड आणि वळिवडे या गावात झालेल्या प्रचार सभेमध्ये वरुणराजाने हजेरी लावली. पण, या तीनही गावातील सभेमध्ये मी जरी भर पावसात बोललो असलो तरी, समोर असलेली दक्षिणची स्वाभिमानी जनतासुद्धा माझ्यासोबत पावसात भिजत होती.
मी काय कमावलंय ? तर प्रत्येक प्रसंगात माझ्यासोबत राहणारी लाख मोलाची माणसं मिळवली. याहून दुसरे कुठले समाधान.
येत्या २१ ऑक्टोबरला मतांचा पाऊस पाडून दक्षिणची स्वाभिमानी जनता ऋतुराजला नक्की विजयी करतील असा ठाम विश्वास वाटतो.
- आमदार सतेज (बंटी) डी. पाटील