आज ऊर्जामंत्री ना. नितीनजी राऊत यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि महावितरण अधिकारी यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत खालील मुद्दे मा.ऊर्जामंत्री यांच्यासमोर मांडले. 1.सध्या जी बिले वाढून आली आहेत, त्याबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत. हा विषय महत्वाचा आहे. त्याबद्दल नेमके बिले वाढू का आलीत? याबद्दल लोकांना योग्य माहिती देणे आवश्यक आहे. 2. मिशन रोजगार च्या निमित्ताने शिरोली MIDC मधील उद्योजकांशी चर्चा केली. काही उद्योगांना भेटी दिल्या. या ठिकाणी वीज बिल कमी करावे, हा विषय सर्व उद्योजकांशी बोलताना प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे उद्योगांचे वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. 3. गेल्या वर्षी पुरामुळे अनेक शेती पंप पाण्याखाली गेले होते. आम्ही डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातुन वळीवडे गाव दत्तक घेतले होते.आणि यामध्ये शेती पंप सुद्धा दुरुस्त करून दिले होते. जर शेती पंप बंद होते तर शेती पंप बिले का येतात ? हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्याचा गंभीरपणे विचार व्हावा. 4. कोल्हापूर दक्षिण हा निम्मा मतदारसंघ ग्रामीण आहे. त्यामधील अनेक शेतकरी बांधवाना शेती पंप जोडणी घेण्यासाठी दिरंगाई होत आहे. यासंदर्भात सुद्धा मा. मंत्री महोदयांनी यावर गांभीर्याने विचार करावा. - आमदार ऋतुराज पाटील
top of page
bottom of page
Comments